गुरुवार, २१ मार्च, २०२४

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

 

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

दोन बौध्द भिक्खू नदी ओलांडत होते तेव्हा वृद्ध भिक्खूने पाहिले की एक तरुणी नदी पार करण्याचा प्रयत्न करीत आहे. नदी खोल असल्याने ती मुलगी म्हणेल, माझा हात धर या विचाराने तो घाबरला होता. ती एक 18 वर्षाची सुंदर मुलगी होती, तो तिच्याजवळून जात असताना त्या मुलीने विचारले की, "मला नदी पार करण्यास मला मदत कराल का?"

तो वृद्ध भिक्खू म्हणाला, मला माफ करा, मी एक भिक्खू आहे आणि मी महिलांना हात लावत नाही. त्याचे हात पाय थरथर कापू लागले आणि तो घाबरून धावत धावत नदी पार गेला. निसर्गाचे आभार मानले की आपण वाचलो, एक संकट सांगून उभे होते, खड्ड्यात पडण्यापासून वाचलो. नदीच्या किनाऱ्यावर पोहचल्यावर मागे वळून पाहिलं तर त्यास मोठा आश्चर्याचा धक्का बसला. त्या आश्चर्यामध्ये थोडा मत्सर आणि थोडी ईर्ष्या देखील होती.

गुरुवार, ७ मार्च, २०२४

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती (SFBT) | Solution-Focused Brief Therapy

 

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती | Solution-Focused Brief Therapy

गौतम बुद्ध दररोज वेगवेगळे उदाहरणे दाखले देऊन आपल्या शिष्यांना महत्त्वाचे संदेश देत असत. एके दिवशी सर्व शिष्य बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी बसले होते. बुद्धांनी आपल्याकडे असलेली दोरी हातात घेऊन एकामागून एक तीन गाठी बांधल्या. दोरीकडे इशारा करून बुद्धांनी शिष्यांना विचारले की ही तीच दोरी आहे का जी तीन गाठी बांधण्यापूर्वी होती?

एका शिष्याने सांगितले की, गाठ पडल्यानंतरही दोरी तीच आहे. दुसऱ्या शिष्याने सांगितले की, आता या दोरीला तीन गाठी बांधण्यात आल्या आहेत, त्यामुळे दोरीचा आकार बदलला आहे. इतर शिष्यांनी सांगितले की दोरीचे स्वरूप बदलले आहे, परंतु त्याचे मूळ तेच आहे. बुद्ध म्हणाले तुम्ही सर्वजण बरोबर आहात. यानंतर बुद्धांनी गाठ उघडण्यासाठी दोरीची दोन्ही टोके पकडून जोरात खेचण्यास सुरुवात केली. बुद्धाने विचारले की दोरीच्या तीनही गाठी अशा प्रकारे उघडल्या जातील का?

असे केल्याने गाठ मजबूत होतील असे शिष्यांनी सांगितले. बुद्ध म्हणाले या गाठी उघडण्यासाठी काय करावे लागेल? एक शिष्य म्हणाला आधी हे बघावे लागेल की या गाठी कशा पडल्या होतात? गाठी कशा सोडवता येतील? गाठी कशा पडल्या आहेत हे जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हा आपण त्या सहजपणे उघडू शकतो.

बुद्ध म्हणाले की, समस्यांचाही आपण तसाच विचार केला पाहिजे. समस्यांचे कारण जाणून न घेता त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण आणखी बिघडू शकते. म्हणूनच जर आपण प्रथम समस्यांचे कारण समजून घेतले तर त्यांचे निराकरण सहज शोधता येईल.

वरिष्ठांची आज्ञा पाळणे | Obedience to Authority

  वरिष्ठांची आज्ञा पाळणे  |  Obedience to Authority अलिकडे ठाणे जिल्यातील एका महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्य...