सोमवार, ५ जून, २०२३

परख: मूल्यमापनाची नवी दिशा | PARAKH

 

परख: मूल्यमापनाची नवी दिशा | PARAKH

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात मूल्यांकन आणि मूल्यमापन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात कारण ते विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील प्रगती, प्रत्यक्ष अनुभूती आणि एकूण शाळेच्या कामगिरीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतात. तसेच मूल्यमापन शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्ये, सामर्थ्य आणि सुधारण्यायोग्य क्षेत्रांवरील माहिती गोळा करण्यात मदत करतात. ही माहिती शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम बनविते. विद्यार्थी काय शिकले आहेत आणि त्यांना कुठे संघर्ष करावा लागत आहे हे समजून घेऊन, शिक्षक शिकवण्यातील धोरण, हस्तक्षेप आणि भिन्न अध्यापन पद्धतींबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात.

नियमित मुल्यांकनामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर वेळोवेळी लक्ष ठेवता येते. विविध अंतराने शिकण्याच्या परिणामांचे मापन करून, शिक्षक कच्चे दुवे ओळखू शकतात, प्रगतीचा मागोवा घेऊ शकतात आणि संभाव्य उद्दिष्टाशी निगडीत तफावत किंवा आव्हाने लवकर ओळखू शकतात. तसेच मूल्यांकन विविध विषय आणि कौशल्यांमधील विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कमकुवतपणाबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. ही माहिती अशी क्षेत्रे ओळखण्यात मदत करतात की विद्यार्थी कोठे उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि कोठे त्यांना अतिरिक्त समर्थन किंवा लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असू शकते. मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या यशाचे पुरावे मिळतात ज्यामुळे शाळा, अधिकारी आणि धोरणकर्त्यांना निश्चित केलेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यात मदत होते. ही माहिती अभ्यासक्रम सुधारणा, संसाधन साधनांचे वाटप आणि व्यावसायिक विकास उपक्रमांबाबत निर्णय घेण्यास मार्गदर्शन करू शकते.

शुक्रवार, २ जून, २०२३

बोधनिक विसंवाद | Cognitive Distortions

 बोधनिक विसंवाद | Cognitive Distortions

 आपल्या जीवनात विचार फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने आपणास विचारशक्ती अगदी मुक्त हाताने बहाल केलेली आहे. निसर्गातील इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती आपल्याकडे खूपच अधिक आहे. कोणत्याही विचारांचा आपल्या जीवनातील अनुभवावर प्रभाव पडत असतो; कारण मनात सतत विचार चालू असतात. मानसशास्त्रानुसार आपल्या डोक्यात दिवसभरात अंदाजे सहा हजार विचार येतात. या विचारांपैकी काही विचार आपण जाणिवपूर्वक करत असतो तर काही विचार आपल्या दृष्टिकोन, संस्कार आणि सवयीमुळे निर्माण होतात. मात्र आपण चांगले किंवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा आपल्या जीवनावर परिणाम हा होतोच! जर आपण सकारात्मक विचार केला तर जीवनात सकारात्मक बदल घडतात आणि चुकीचे किंवा नकारात्मक विचार केल्यास त्याप्रमाणे बदल घडतात.   

थोडक्यात आपण एखाद्यावेळी काही काम करत नसलो, अगदी रिकामे जरी बसलेले असलो तरीही आपल्या मनात विचार सुरूच असतात. आपले मन हे निरंतर विचार करणारे रेडिओ स्टेशन आहे, त्यामध्ये एक विचार संपण्यापूर्वी दुसऱ्या विचाराने जागा घेतलेली असते (झेन गुरु थिक नाट हान : Silence: The Power of Quiet in a World Full of Noise). अगदी सकाळी उठल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस सतत विचार करत असतो. एखादे काम करत असतानादेखील मेंदुमध्ये खोलवर कुठेतरी सतत विचार सुरू असतात. जर आपण सतत विचारच करत असू तर आपण नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. शिवाय विचारांप्रमाणे आपले जीवन घडत असेल तर आपण विचार करताना सतत सावध असणे फार गरजेचे असते. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार आपणास जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जातात. नकारात्मक विचारापासून सकारात्मक विचाराकडे जाणारा प्रवास नक्की असतो तरी कसा? कोणत्या पद्धतीने आपण सकारात्मक विचार करू शकतो? खरंच सकारात्मक विचार आपले जीवन बदलून टाकतात का? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपणास बोधनिक वर्तनात्मक उपचार (CBT) पद्धतीमध्ये पद्धतशीरपणे पाहायला मिळतात. तत्पपुर्वी आपण बोधनिक विसंवाद म्हणजे काय? आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे पाहूया.

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती (SFBT) | Solution-Focused Brief Therapy

  समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती | Solution - Focused Brief Therapy गौतम बुद्ध दररोज वेगवेगळे उदाहरणे दाखले देऊन आपल्या शिष्यांन...