वरिष्ठांची आज्ञा पाळणे |
अलिकडे ठाणे जिल्यातील एका महाविद्यालयात
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना त्या संबंधीचा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे उघडकीस आला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर
विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये
विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवायला भाग पाडून अमानुष मारहाण
केली जात आहे. संबंधीत महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांना
संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणादरम्यान
विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात.
यावेळी विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. पण
विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये
एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत.
ही एवढी क्रूरता येते कोठून? त्या मुलाने
संबंधीत मुलाला का मारहाण केली असेल? यामागे काही मानसशास्त्रीय काही कारणे आहेत का?
मिलग्राम प्रयोग हा वरिष्ठांच्या आज्ञा पाळण्यावर त्याचा कसा परिणाम होतो याचा
अभ्यास करणारा एक प्रसिद्ध आणि वादग्रस्त अभ्यास झाला.