शनिवार, २७ एप्रिल, २०२४

वरिष्ठांची आज्ञा पाळणे | Obedience to Authority

 

वरिष्ठांची आज्ञा पाळणे Obedience to Authority

अलिकडे ठाणे जिल्यातील एका महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना त्या संबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे उघडकीस आला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवायला भाग पाडून अमानुष मारहाण केली जात आहे. संबंधीत महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. पण विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत.

ही एवढी क्रूरता येते कोठून? त्या मुलाने संबंधीत मुलाला का मारहाण केली असेल? यामागे काही मानसशास्त्रीय काही कारणे आहेत का? मिलग्राम प्रयोग हा वरिष्ठांच्या आज्ञा पाळण्यावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणारा एक प्रसिद्ध आणि वादग्रस्त अभ्यास झाला.

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

इंटर्नशिप / आंतरवासिता कार्यक्रम | Internship Program

 

इंटर्नशिप / आंतरवासिता कार्यक्रम | Internship Program

विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमता वाढवण्यासाठी आणि संशोधनाचे महत्व समजून घेण्यासाठी, सोबतच त्यांना क्रेडिट मिळवून देण्याच्या उद्देशाने सक्तीचे इंटर्नशिप करण्याची शिफारस करणारे मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. Guidelines for Internship/Research Internship for Under Graduate Students.” याचा मसुदा राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या सुसंगाने जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवात्मक शिक्षणासाठी, सक्रिय सहभागासाठी संधी प्रदान करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमात संशोधन आणि इंटर्नशिपचा समावेश करण्यावर भर दिला जातो.

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

आनंदाचे बीजगणित | The Algebra of Happiness

 

आनंदाचे बीजगणित | The Algebra of Happiness

जीवनात आनंदी राहायचे असेल तर खूप सोपे आहे, पण आनंदी आहे हे दाखवायचे असेल तर ते महाग आहे. कारण आनंदी असणं आणि आनंदी असल्याचे जगाला दाखविणे यासाठी धडपड करावी लागते. आजकाल लोक प्रवास करत असताना तो जगाला दाखयाच्या नादात प्रवासाचा आनंद घ्यायचाच विसरून जात आहेत. हे खाण-पीन आणि सगळ्याच गोष्टी दाखविण्यासाठीची जणू स्पर्धाच सुरु आहे त्यामुळे आनंदी जगण्याचे बीजगणित स्कॉट गॅलोवे यांनी ‘द अल्जेब्रा ऑफ हॅपिनेस’ या पुस्तकातून मांडलेला आहे.

स्कॉट गॅलोवे हे न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे मार्केटिंगचे प्राध्यापक आहेत, कदाचित आपणास ते सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक द फोर: द हिडन डीएनए ऑफ ऍमेझॉन, ऍपल, फेसबुक आणि गुगलचे लेखक म्हणून माहित असतील (जर माहित नसतील तर त्यांचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे). द अल्जेब्रा ऑफ हॅपिनेस हे गॅलोवेचे दुसरे पुस्तक आहे आणि ते आनंदी जीवनाच्या मूलभूत गोष्टींबद्दल त्यांचा दृष्टीकोन दर्शविते. गॅलोवेच्या वैयक्तिक अनुभवातून छोट्या छोट्या रंजक कथामधून आपल्या संपत्तीपासून आरोग्यापर्यंत, आणि आपल्या प्रेम संबंधाविषयीची शिकवण सदर पुस्तकातून दिलेली आहे.

रविवार, ७ एप्रिल, २०२४

रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

 

रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

     एम्प्लॉयमेंट असेसमेंट कंपनी “एस्पायरिंग माइंड्स” च्या अहवालानुसार, देशातील 80 टक्क्यांहून अधिक भारतीय अभियंते बेरोजगार आहेत.  तर अभियांत्रिकी केलेल्या मोजक्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर नोकरी मिळते.  एस्पायरिंग माइंड्सचे सह-संस्थापक वरुण अग्रवाल म्हणतात की, देशभरातील शैक्षणिक संस्था लाखो तरुणांना प्रशिक्षण देतात परंतु या संस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी रोजगारासाठी तयार नसतात आणि कंपनीनुसार रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान नसल्याची तक्रार अनेकदा केली जाते.

गुरुवार, २१ मार्च, २०२४

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

 

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

दोन बौध्द भिक्खू नदी ओलांडत होते तेव्हा वृद्ध भिक्खूने पाहिले की एक तरुणी नदी पार करण्याचा प्रयत्न करीत आहे. नदी खोल असल्याने ती मुलगी म्हणेल, माझा हात धर या विचाराने तो घाबरला होता. ती एक 18 वर्षाची सुंदर मुलगी होती, तो तिच्याजवळून जात असताना त्या मुलीने विचारले की, "मला नदी पार करण्यास मला मदत कराल का?"

तो वृद्ध भिक्खू म्हणाला, मला माफ करा, मी एक भिक्खू आहे आणि मी महिलांना हात लावत नाही. त्याचे हात पाय थरथर कापू लागले आणि तो घाबरून धावत धावत नदी पार गेला. निसर्गाचे आभार मानले की आपण वाचलो, एक संकट सांगून उभे होते, खड्ड्यात पडण्यापासून वाचलो. नदीच्या किनाऱ्यावर पोहचल्यावर मागे वळून पाहिलं तर त्यास मोठा आश्चर्याचा धक्का बसला. त्या आश्चर्यामध्ये थोडा मत्सर आणि थोडी ईर्ष्या देखील होती.

गुरुवार, ७ मार्च, २०२४

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती (SFBT) | Solution-Focused Brief Therapy

 

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती | Solution-Focused Brief Therapy

गौतम बुद्ध दररोज वेगवेगळे उदाहरणे दाखले देऊन आपल्या शिष्यांना महत्त्वाचे संदेश देत असत. एके दिवशी सर्व शिष्य बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी बसले होते. बुद्धांनी आपल्याकडे असलेली दोरी हातात घेऊन एकामागून एक तीन गाठी बांधल्या. दोरीकडे इशारा करून बुद्धांनी शिष्यांना विचारले की ही तीच दोरी आहे का जी तीन गाठी बांधण्यापूर्वी होती?

एका शिष्याने सांगितले की, गाठ पडल्यानंतरही दोरी तीच आहे. दुसऱ्या शिष्याने सांगितले की, आता या दोरीला तीन गाठी बांधण्यात आल्या आहेत, त्यामुळे दोरीचा आकार बदलला आहे. इतर शिष्यांनी सांगितले की दोरीचे स्वरूप बदलले आहे, परंतु त्याचे मूळ तेच आहे. बुद्ध म्हणाले तुम्ही सर्वजण बरोबर आहात. यानंतर बुद्धांनी गाठ उघडण्यासाठी दोरीची दोन्ही टोके पकडून जोरात खेचण्यास सुरुवात केली. बुद्धाने विचारले की दोरीच्या तीनही गाठी अशा प्रकारे उघडल्या जातील का?

असे केल्याने गाठ मजबूत होतील असे शिष्यांनी सांगितले. बुद्ध म्हणाले या गाठी उघडण्यासाठी काय करावे लागेल? एक शिष्य म्हणाला आधी हे बघावे लागेल की या गाठी कशा पडल्या होतात? गाठी कशा सोडवता येतील? गाठी कशा पडल्या आहेत हे जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हा आपण त्या सहजपणे उघडू शकतो.

बुद्ध म्हणाले की, समस्यांचाही आपण तसाच विचार केला पाहिजे. समस्यांचे कारण जाणून न घेता त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण आणखी बिघडू शकते. म्हणूनच जर आपण प्रथम समस्यांचे कारण समजून घेतले तर त्यांचे निराकरण सहज शोधता येईल.

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

समुदाय सहभागिता कार्यक्रम (CEP) | Community Engagement Programme

सामुदायिक सहभागिता कार्यक्रम (CEP) | Community Engagement Programme

आपले शिक्षण आजच्या संदर्भाशी सुसंगत सामाजिक जबाबदारीचे उद्दिष्टे, तत्त्वे आणि स्वरूपांचे विश्लेषण करण्यासाठी 2011 मध्ये तज्ञांच्या समितीव्दारे (तत्कालीन नियोजन आयोगाने स्थापन केलेल्या) राष्ट्रीय आढावा घेण्यात आला. भारतातील “सामाजिक जबाबदारी आणि उच्च शिक्षणाची सामुदायिक सहभागिता वाढवणे” याविषयीच्या शिक्षण मंत्रालयाला (MoE) केलेल्या शिफारशींमध्ये नवीन धोरणासाठी अनेक महत्त्वाचे घटक त्यामध्ये होते. 2020 मध्ये भारत सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने (NEP) देशातील उच्च शिक्षणासाठी एक परिवर्तनात्मक आराखडा सादर केला आहे. नवीन धोरणामध्ये आधीच समाविष्ट केलेल्या अनेक शिफारशींना बळकटी दिली आहे, ज्याचे उदाहरण खालील ओळींतून दिसून येते:

वरिष्ठांची आज्ञा पाळणे | Obedience to Authority

  वरिष्ठांची आज्ञा पाळणे  |  Obedience to Authority अलिकडे ठाणे जिल्यातील एका महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्य...