यशाची
गुरुकिल्ली
एके काळी ज्ञान प्रकाश नावाचा एक
ज्ञानी माणूस आसरा नावाच्या खेडे गावात राहत होता. तो श्रीमंत आणि ज्ञानाने परिपूर्ण
होता, त्याचे हे ज्ञान पाहून दूरदूरच्या ठिकाणाहून लोक
त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे येत असत. ज्ञान प्रकाश आपल्या अनुभव
आणि ज्ञानाने लोकांच्या समस्या सोडवत असत. म्हणून प्रत्येकजण त्यांना गुरुजी संबोधत असत. एके दिवसी एक तरुण गुरुजींकडे आला आणि म्हणाला -
"गुरुजी, मला यशाचे रहस्य सांगा, मलासुद्धा
तुमच्यासारखे विद्वान बनून माझ्या गरीबीवर मात करता यावी अशी माझी इच्छा
आहे."
गुरुजी हसले आणि त्यांनी त्यांस दुसऱ्या
दिवशी सकाळी नदीच्या काठावर भेटण्यास बोलावले. त्या युवकाने आंघोळ करावी लागेल म्हणून
आपले कपडे घेतले आणि सकाळी नदीकाठी पोहोचला. गुरुजींनी त्या तरूणास नदीच्या खोल
पाण्यात नेले आणि गळ्यापर्यंत पाणी पाहून तिथे त्यांनी त्यास बुडविले. थोड्या
वेळाने त्या तरूणाने धडपड करून जोरदार प्रतिकार केला तेंव्हा गुरूजीनी त्यास सोडून
दिले. तरूण धापा टाकत नदीकाठी पळाला. जेव्हा त्यास आराम वाटू लागले, तेव्हा तो म्हणाला - "मला मारायचे ठरविले आहे का?"