सोमवार, १७ मे, २०२१

अवसाद | औदासीन्य | Depression

 अवसाद किंवा औदासीन्य (Depression)

एकविसाव्या शतकात प्रत्येकजण ताण-तणावाशी झगडत आहे. अशी मानसिक स्थिती कमिअधिकपणे आपण प्रत्येकजण अनुभवतो. आपली मानसिक स्थिती आणि बाह्य परिस्थितीमध्ये संतुलन आणि सुसंवाद निर्माण न झाल्याने तणाव निर्माण होतो. तणावामुळे आपल्या जीवनात अनेक मनोविकार उद्भवत असतात. सामान्यपने दैनंदिन जीवनात थोड्या प्रमाणात ताण-तणाव असणे समस्या नसून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी असा ताण घेणे आवश्यक आहे, परंतु जर ते आपल्या भावनिक आणि शारीरिक जीवनाचा भाग बनले तर ते धोकादायक सिद्ध होऊ शकतात. आपल्या जीवनात केंव्हातरी आपण निरुत्साह आणि निराश यासारख्या नकारात्मक भावनांचा अनुभव घेतलेला आहे. अपयश, संघर्ष आणि नातेसंबंधातील दुराव्यामुळे दु:खी होणे सामान्य आहे. परंतु जर निरुत्साह, दुःख, असहायता, निराशा यासारख्या भावना काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत टिकून राहत असतील आणि एखाद्या व्यक्तीला आपली दैनंदिन कामे करण्यात अडथळा निर्माण होत असेल तर ते औदासीन्य/ अवसाद  (depression) या मानसिक आजाराची लक्षणे असू शकतात.

सोमवार, १० मे, २०२१

प्रतिभावान लोकांची गुणवैशिष्टे | बुद्धिमत्ता म्हणजे काय | Intelligent People

 

प्रतिभावान लोकांची गुणवैशिष्टे

बुद्धी हा शब्द आपण सामान्यपणे आपल्या दैनंदिन संभाषणामध्ये अनेकवेळा वापरतो. आपण दैनंदिन जीवनात 'बुद्धिमत्ता' हा शब्द वेगवान गतीने शिकणे आणि समजून घेण्यासाठी, प्रखर स्मरणशक्ती आणि तार्किक विचारांसाठी वापरतो. 'बुद्धी' हा शब्द सामान्य अर्थाने वेगळा असल्याने मानसशास्त्रज्ञानी तो विशिष्ट अर्थाने वापरला आहे. सुरवातीपासूनच अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम, बोरिंग (1923) यांनी बुद्धिमत्तेची कार्यात्मक व्याख्या सांगितली की “बुद्धिमत्ता चाचण्याद्वारे जे मापन केले जाते ती बुद्धिमत्ता”. परंतु या व्याख्यातून बुद्धिमत्तेच्या स्वरूपाबद्दल निश्चित अर्थ प्राप्त होत नाही. कारण बुद्धिमत्ता मापण्यासाठी अनेक चाचण्या उपलब्ध आहेत, यापैकी कोणत्या चाचणीद्वारे केले गेलेले मापन बुद्धिमत्ता असे म्हणता येईल?. बोरिंगनंतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व व्याख्या तीन मूलभूत प्रकारात विभागल्या जाऊ शकतात -

सोमवार, ३ मे, २०२१

विषारी लोक | टॉक्सिक पीपल | Toxic People

 

विषारी लोक | टॉक्सिक पीपल | Toxic People

शौर्य दहा वर्षाचा असताना एका मुलाबरोबर त्याचे कडक्याचे भांडण झाले होते. भांडणाचे कारण होते तो मुलगा अर्वाच्य शिवीगाळ करतो म्हणून पण कोल्हापूर सारख्या शहरात शिवी ही सर्वसामान्य मानली जाते. शौर्यला विचारले की शिवी दिली म्हणून काय झाले? त्यावर तो म्हणाला होता की “त्याच्या अशा वागण्याने आमच्या खेळात व्यत्यय येतो आणि सर्वजन खेळ सोडून एकमेकांना शिवी देतात आणि शेवट भांडणाने होतो. त्यामुळे तो मुलगा जवळून जरी गेला तरी त्रास होतो त्यामुळे त्याच्याशी खेळणे टाळतो.” आपणासही असा अनुभव आला असेल की काही लोक आपल्या जवळ असतील तर खूपच आल्हाददायक वाटते आणि काही लोक कधी निघून जातील असे वाटत राहते. आपण नेहमी आल्हाददायक लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो तर विषारी लोकांना टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. 

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

न्यूरोबिक्स : मेंदूचा व्यायाम | Neurobics

 न्यूरोबिक्स : मेंदूचा व्यायाम

बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग असला तरीही कोणताही बदल भीतिदायक असतो. बदल मानवी जीवनातील एक न टाळता येण्याजोगी गोष्ट आहे, मग तो बदल अगदीच क्षुल्लक असो किंवा आयुष्य बदलवून टाकणारा असो. बदलाविषयीची भीती मानवी मेंदूच्या रचनेमध्येच असते आणि जेव्हा अशी भीती निर्माण होते, तेव्हा ती सर्जनशीलता, बदल आणि यशाला अटकाव करते.

उत्क्रांतीच्या काळापासूनच मेंदू हा मानवी शरीरातील सर्वांत विलक्षण अवयव आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये पाठीचा कणा, हृदय, यकृत, आतड्यांसारखे इतर अवयव योग्यरीत्या विकसित झाले आणि त्याच अवस्थेत टिकून राहिले. मानवी मेंदू मात्र गेली चार ते पाच कोटी वर्षे विकसित होत आहे आणि त्यामध्ये बदलही घडत आहे. सुमारे एक ते दोन कोटी वर्षांपूर्वी विकसित झालेल्या रचनेनुसार सध्या मानवी शरीरात तीन स्वतंत्र मेंदू आढळतात. शारीरिक आणि मानसिक आजार टाळण्यासाठी या तीन मेंदूंमध्ये योग्य समन्वय राखणे हे आज मानवासमोरील एक प्रमुख आव्हान आहे.

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

अभ्यास सवयी | Study Habit

 

अभ्यास सवयी | study habit

माझा अभ्यास का होत नाही? अभ्यासात माझे मन का लागतं नाही? पाठांतर केलेले माझ्या डोक्यात का बसत नाही? इ. अनेक प्रश्न आपल्या पाल्याला पडत असतात. हे सर्व प्रश्न सुटले की पालक म्हणून आपण जिंकलो. बऱ्याचदा असं दिसून येत की विद्यार्थी महत्त्वाच्या परीक्षामध्ये त्यांना हवे तसे गुण मिळवण्यात यशस्वी होत नाहीत. असं ऐकायला मिळत की मी खुप अभ्यास केला होता. पण माहित नाही मला चांगले मार्क्स मिळाले नाहीत. माझे नशीबच ख़राब आहे. शेवटच्या क्षणी मी सगळं विसरलो. अशा तक्रारी विद्यार्थी करताना आढळतात, इतर मुलांशी तुलना करून माझ्याच मुलाला एवढे कमी गुण का मिळाले? आणि मग ही संपूर्ण चर्चा शैक्षणिक पद्धतीवर येउन संपते. परिक्षांचा प्रकार, अभ्यासक्रम प्रारूप, शाळा- महाविद्यालय, शिक्षक बरोबर शिकवतच नाहीत इ. काही मुद्दे बरोबर ही असतील, परंतु कुठेतरी विद्यार्थ्याची जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. खरं म्हणजे या सर्वांचा मूळ मुद्दा अभ्यास करणं म्हणजेच नुसती घोकंपट्टी किंवा अतिपरिश्रम न करताही योग्य पथ्दती, तत्त्वे आणि कृती कार्यक्रमांचा वापर करणे होय. हा एक नियोजनबध्द, संघटित आणि उद्देशप्रणित प्रवास असला पाहिजे.

      सुरुवात आपण अशी करुया की आपण काय वाचलं, त्यातलं किती समजलं आणि आता किती लक्षात आहे? नेपोलियन म्हणत असे की, कुठलंही युद्ध जिंकाण्याआधी मी ते माझ्या डोक्यात जिंकलेलो असतो.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

यशाची गुरुकिल्ली | Success Factor

 

यशाची गुरुकिल्ली

एके काळी ज्ञान प्रकाश नावाचा एक ज्ञानी माणूस आसरा नावाच्या खेडे गावात राहत होता. तो श्रीमंत आणि ज्ञानाने परिपूर्ण होता, त्याचे हे ज्ञान पाहून दूरदूरच्या ठिकाणाहून लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे येत असत. ज्ञान प्रकाश आपल्या अनुभव आणि ज्ञानाने लोकांच्या समस्या सोडवत असत. म्हणून प्रत्येकजण त्यांना गुरुजी संबोधत असत. एके दिवसी एक तरुण गुरुजींकडे आला आणि म्हणाला - "गुरुजी, मला यशाचे रहस्य सांगा, मलासुद्धा तुमच्यासारखे विद्वान बनून माझ्या गरीबीवर मात करता यावी अशी माझी इच्छा आहे."

गुरुजी हसले आणि त्यांनी त्यांस दुसऱ्या दिवशी सकाळी नदीच्या काठावर भेटण्यास बोलावले. त्या युवकाने आंघोळ करावी लागेल म्हणून आपले कपडे घेतले आणि सकाळी नदीकाठी पोहोचला. गुरुजींनी त्या तरूणास नदीच्या खोल पाण्यात नेले आणि गळ्यापर्यंत पाणी पाहून तिथे त्यांनी त्यास बुडविले. थोड्या वेळाने त्या तरूणाने धडपड करून जोरदार प्रतिकार केला तेंव्हा गुरूजीनी त्यास सोडून दिले. तरूण धापा टाकत नदीकाठी पळाला. जेव्हा त्यास आराम वाटू लागले, तेव्हा तो म्हणाला - "मला मारायचे ठरविले आहे का?"

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य | Balanced Diet and Mental Health

संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य 

आपण जगण्यासाठी खातो कि खाण्यासाठी जगतो? हा खुप गहन प्रश्न आहे, कारण बरेच लोक अभिमानाने म्हणतात की ‘आपण खाण्यासाठी जगतो आहोत’. याचा अर्थ कोणतेही ध्येय नसणारे लोकच असे बोलू शकतात. कारण ध्येयवेड्या लोकांना अन्न पाण्याचीही शुद्ध नसते. अन्नाशी आपला संबंध खूप गुंतागुंतीचा आहे. अन्न पदार्थाचे मूल्य, त्यांची उपलब्धता आणि आजूबाजूच्या लोकांच्या खाण्याच्या सवयी यावर हा संबंध अवलंबून आहे. आपण मनुष्य म्हणून इतरांना एक गोष्ट सामायिक करत असतो आणि केंव्हाही भेटल्यावर एका गोष्टीची विचारपूस करत असतो ती म्हणजे ‘आबा/ काका जेवलात का?’ किंवा चहा-पाणी झाले का? आपले आयुष्य हे पोटाची खळगी भरण्यातच वाया घालवतो असे 50 ते 60 टक्के लोकाना वाटत असते.  तसेच टिचभर पोटासाठी आयुष्याचे रान करणारे लोकही आपण अवतीभोवती पाहत असतो. 

मानवी मनाची अद्भुत रहस्ये : The Amazing Mysteries of the Human Mind

  मानवी मनाची अद्भुत रहस्ये ( The Amazing Mysteries of the Human Mind) संपूर्ण विश्वात जर एखादी गोष्ट सर्वात रहस्यमय , अचंबित करणारी आणि अ...